अनंत जन्मांच्या दुःखाची निवृत्ती व परमात्म सुखाची प्राप्ती जीवाला व्हावी यासाठीच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, समर्थ रामदास आदि आदि संतानी देह व जीवनाची तमा न बाळगता जगाला भक्तिमार्ग सिध्द केला.या प्रमानेच संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनीही नामाने साधकांना देवाचा साक्षात्कार(अनुभव) आणुन देण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत बोधला महाराज, संत चोखा महाराज, संत सोयराबाई, संत भानुदास महाराज, संत कान्होबा, संत निळोबाराय,संत एकनाथ महाराज, संत नामदेव, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान, संत तुकाराम महाराज या सर्वांना आलेले भक्तिमार्गातील अवस्थेचे अनुभव ओवी रूपामध्ये मांडले आहेत.
सामान्य माणसे संसारात त्रस्त झाली व व्यवहारीक उपाययोजनेने ते दु:ख दुर होत नाही असे दिसले म्हणजे मग देवाकडे धाव घेतात व म्हणूनच दु:ख हरण करणारा हा देवाचा धर्म ज्यात सांगीतला आहे ते नाम हरीपाठ रुपाने चटकन डोळयासमोर येते व वारंवार उच्चारले जाते.
देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचे संचले जैसे तैसे ॥